राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपच्या कार्यसंघ बैठकीत घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केली आहे. यासोबतच त्यांनी अजित पवार गट आणि शिंदे गटावरही निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून वादग्रस्त चर्चांना उधाण आले आहे. सध्या राज्यात अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गटाचे महायुतीचे सरकार आहे. आगामी निवडणुका आम्ही एकत्र लढणार असल्याचा दावा तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
अशा स्थितीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर अकाउंटवर पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे, नागपुरात भाजप-आरएसएसची वैचारिक बैठक झाली"
नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 20, 2023
नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे…
तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय होऊ शकते यावर बैठकीत चर्चा झाली. या विचारमंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवायची असे ठरले.’ असा दावाही आव्हाड यांनी केला,.
"ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकारणाची जाणीव आहे. त्यांना लगेच समजले असेल की महाराष्ट्रात भाजप एकटाच लढणार आहे. ज्यांना भाजपकडून निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही.
हेही वाचा