मुंबईत येत्या जून महिन्यापासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू होणार असून त्यामुळे सध्या महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणारी जकात बंद होणार आहे. त्यामुळे जकात अजून तीन महिने वसूल केला जाणार असल्यामुळे ती महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याऐवजी महापालिकेचे अधिकारी स्वत:च्याच खिशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकप्रकारे जकात लुटो असाच प्रकार सुरू असल्यामुळे याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
सह आयुक्त व्ही राधा यांच्या काळात जकातीचे उत्पन्न सात हजारांवर पोहोचले होते. ते आजही कायम आहे, त्यात वाढ झालेली नाही, जकात वसुलीबाबतची मानसिकता बदलली गेली पाहिजे. मुलुंड जकात नाक्यामुळे टोल नाका मुंबईच्या हद्दीत आणला गेला आहे. त्याचा फटका हरिओम नगरवासियांना बसत आहे. त्यामुळे जकात बंद झाल्यानंतर टोल नाका जकात नाक्याच्या ठिकाणी हलवला जावा. जेणेकरून मुंबईच्या हद्दीत राहणाऱ्या जनतेला टोल भरावा लागतो, तो भरावा लागणार नाही.
प्रभाकर शिंदे, नगरसेवक, भाजपा