अफवा पसरवणाऱ्या 161 जणांवर गुन्हे दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नवनवीन अफवा सोशल मिडियावर पसरवल्या जात आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी सायबर पोलिसांनी आता कठोर पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहेत. व्हॉटस अँपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्या ग्रुपच्या अँडमिनवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य सायबर पोलिस उपमहानिरीक्षक हरीष बैजल यांनी स्पष्ठ केले आहे. त्यामुळे आपण जर कोणत्या व्हाँट्स ग्रुपचे अँडमिन असाल तर त्वरित सेटिंगमध्ये जाऊन संबधित ग्रुपच्या सेटींगमध्ये जाऊन त्या ग्रुपवर तुम्हीच फक्त मेसज करू शकता, असे सेटींग करा असे आवाहन केले आहे.राज्यभरात अशा समाजकंटकांवर तब्बल 161 गुन्हे नोंदवण्यात आले आहे. 

महाराष्ट्र सायबर पोलिस सध्या टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. पोलिसांनी विविध जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात आता गुन्हे नोंदवण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये बीड 22, कोल्हापूर 13,पुणे ग्रामीण 12, मुंबई 11, जळगाव 10, जालना 9, नाशिक ग्रामीण 8,सातारा 7, नांदेड 6, नागपूर शहर 5, नाशिक शहर 5, परभणी 5ठाणे शहर 4, बुलढाणा 4, गोंदिया 3,भंडारा 3, अमरावती 3, लातूर 3,नंदुरबार 2, नवीमुंबई 2 उस्मानाबाद 2,हिंगोली 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे . यात आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 89 गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 41 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,titktok विडिओ शेअर प्रकरणी 3गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर दद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 23गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 36 आरोपींना अटक केली आहे .   

राज्यात काल  विविध  जिल्ह्यात कोल्हापूर,बीड ,जालना , लातूर ,जळगाव , परभणी , पुणे ग्रामीण ,या सर्व ठिकाणी नवीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे .या गुन्ह्यांमध्ये आरोपीनी आपल्या फेसबुक /व्हाट्सअँप  व अन्य सोशल मीडियाचा (social media )वापर करून कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या , ज्यामुळे त्या परिसरात अशांतंता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. 
मुंबईमध्ये काल कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे .सदर आरोपीने एका विशिष्ट मेडिकल स्टोअरच्या स्टाफला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे व त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने सदर दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करू नये अशा आशयाचा खोटा मेसेज व्हाट्सअँपद्वारे सगळीकडे पसरविला होता.आतापर्यंत करण्यात आलेल्या अनेक कारवायांमध्ये ग्रुपमधील उपद्रवींकडून पसरवण्यात आलेल्या अफवांना ग्रुप अँडमिनला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच बैजल यांनी व्हाँट्स अँप ग्रुप अँडमिना सध्याच्या पार्श्वभूमिवर त्याच्या ग्रुपमधील सेटींगमध्ये जाऊन ज्या ग्रुपला ते  अँडमिन आहेत. त्या ग्रुपवर फक्त तेच मेसेज टाकू शकतील अशी सेटींग करण्याचे आवाहन बैजल यांनी केले आहे.

  सतर्कता बाळगावी

सध्या या लॉकडाऊनच्या काळात काही नवीन प्रकारच्या  सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे . कोणत्या ही वस्तूंची ऑनलाईन  ऑर्डर करताना, बऱ्याचदा एका खोट्या संकेत स्थळावर (website ) वर तुम्हाला डायरेक्ट केले जाते व मोबाईल नंबर विचारला जातो आणि मोबाईल नंबर एंटर केल्यावर एक कॉल येतो व त्या संकेतस्थळावरील (website ) एक फॉर्म भरायला सांगितलं जातो ज्यामध्ये बँक अकॉउंटचे सर्व डिटेल्स,क्रेडिट/ डेबिट कार्ड ची सर्व माहिती विचारली जाते .त्यांनतर फोन वरील व्यक्ती आपल्या मोबाइलवर येणारा  otp कन्फर्म (confirm) करायला सांगते आणि कॉल डिस्कनेक्ट होतो व काही वेळात ग्राहकाला आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज येतो. सर्व नागरिकांनी अशी online खरेदी करताना सतर्कता बाळगून आपले कोणतेही बँक डिटेल्स शेअर करू नयेत व असे काही घडल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर बँकेला तात्काळ कळवून आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी ,तसेच सदर गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर (website ) पण कळवावी.

पुढील बातमी
इतर बातम्या