राणा आणि पाठक बाईंच्या लग्नाचे काही खास फोटो

मुंबई - झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजली या दोघांनी प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे हे काही वेगळं सांगायला नको. आता प्रेक्षकांना वेध लागले आहेत ते या दोघांच्या लग्नाचे. 

राणाने अंजलीकडे आपलं प्रेम व्यक्त केलं आणि लग्नाची मागणी घातल्यानंतर या गोष्टीने नवं वळण घेतलं आहे. दोघांच्याही घरी लग्नाची तयारी, खरेदीची लगबग सुरू झाली आहे. 

ही लगीनघाई प्रेक्षकांना सध्याच्या भागांमधून बघायला मिळतेय आणि आता या दोघांचं लग्न बघायला मिळणार आहे दोन तासांच्या विशेष भागामधून. 

येत्या रविवारी 5 मार्चला सायंकाळी 7 ते 9 या वेळेत हा विवाह विशेष सोहळा होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या