आजपासून पुढील 3 दिवस मुंबईसह राज्यभरात अतिवृष्टीचा इशारा

आजपासून (बुधवार) पुढील तीन दिवसही मुंबईसह (Mumbai)कोकणात (Kokan) मुसळधार पावसाचा (heavy rain)इशारा देण्यात आला आहे.

कुलाबा हवामान विभागानं दिलेल्या या इशाऱ्यात बुधवारी मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.

तर पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा बुधवारसाठी देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी वगळता इतर जिल्ह्यांत शनिवारी थोडी उघडीप पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आजही अनेक भागात मोठा पाऊस बरसला आहे.

मुंबई, कोकणासह इतरही काही जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये अति मुसळधार पावासाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी मुळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शुक्रवारी पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

हेही वाचा - सांताक्रूझ पूर्वेकडील रेल्वे स्थानकाबाहेरील 'हा' भाग तात्पुरता बंद


पुढील बातमी
इतर बातम्या