राज्यात तीन दिवस थंडीची तीव्र लाट, IMD चा अंदाज

वातावरणातील या बदलामुळे राज्यात धंडीचा जोर वाढाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा जोर धरत गारठा वाढला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या या वाऱ्यामुळे राज्यात आजपासून 3 दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात येत्या 10 जानेवारीपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार आहे. मुंबई, कोकणस संपूर्ण महाराष्ट्रात ही थंडीची लाट जाणवेल. त्यामुळे मुंबईसह कोकणात पहाटेच्या किमान तापमान सरासरी पेक्षा घट झाल्याचे दिसून येईल. मुंबईसह परिसराच्या तापमानात सरासरीच्या 2 अंशाची घसरण होईल.

तीन दिवसानंतर असं राहील हवामान

राज्यात आजपासून तीन दिवस म्हणजे 10 जानेवारीपर्यंत थंडीचा जोर कायम राहील. त्यानंतर शनिवार म्हणजे 11 जानेवारीपासून मात्र मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील किमान तापमानात वाढ होत थंडीचा जोर कमी होईल. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे .

राज्यावर हलक्या हवेचे उच्चं दाब क्षेत्रही निर्माण झाल्याने प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचे (अँटीसायक्लोनिक विंड) क्लॉकवाईज पद्धतीने गोलाकार वहन होत असते. तर उत्तर भारतात पश्चिमी झंजावातामुळे तेथे पावसाचे संकट निर्माण झाले आहे. अशात नवीन पश्चिमी झंजावाताही येण्याच्या तयारीत आहे. हवामानाच्या या परिस्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम होत आहे.

उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 10 अंश पेक्षा कमी

राज्यात उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर जास्त आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आला आहे. काल म्हणजेच मंगळवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी 8.8 अंश तापमान नोंदले गेले. धुळे आणि निफाड येथेही पारा 10 अंशांच्या खाली आला होता. हवामानाची ही स्थिती लक्षात घेता पुढचे तीन दिवस उत्तर महाराष्ट्रासह संपुर्ण राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे.


हेही वाचा

नवी मुंबईत आज 'या' भागात पाणीपुरवठा बंद

वायू प्रदूषणाविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या