देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून त्यातील ३१२ वाघ हे महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांतील आहेत. चौथ्या अखिल भारतीय वाघ जनगणनाच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. (tiger count in maharashtra published on world tiger day)
‘वर्ल्ड टायगर डे’च्या पूर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणाऱ्या वाघांच्या जनगणनविषयीचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय मीडिया सेंटर इथं प्रकाशित केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो तसंच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाघांची वाढती संख्या
प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रातील ६ व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण ३१२ वाघांची संख्या नोंदविण्यात आली आहे. यापूर्वीच्या अहवालात २००६ मध्ये ही संख्या १०३, २०१० मध्ये १६८, २०१४ मध्ये १९० होती. तर २०१८-१९ च्या सर्वेक्षणामध्ये हा आकडा वाढून ३१२ वर गेला आहे. यामुळे भविष्यात व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन क्षेत्रात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
पर्यावरणाचा समतोल
‘वाघ’ हा जंगलाचा राजा असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलाचा महत्त्वाचा घटक समजला जातो. वाघांची वाढती संख्या पर्यावरणात समतोल असल्याचे दर्शविते. वाघ आणि इतर प्राण्यांची वाढती संख्या हे भारताला जागतिक पटलावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देण्यात भूमिका निभावू शकतात. भारतामध्ये जैवविविधतेचं प्रमाण ८ टक्के आहे. वृक्ष, निसर्ग, वन्यजीवन वाचवण्याची आणि जतन करण्याची भारतीय संस्कृती आहे. भारतात, जगातील वाघांच्या संख्येच्या ७० टक्के वाघ आहेत. ही एक प्रशंसनीय बाब आहे. मानव आणि प्राण्यांचा संघर्ष टाळण्यासाठी जंगलांमध्ये पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रथमच लिडर सेंसरचा वापर केला जाईल, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.
चौथ्या अखिल भारतीय व्याघ्र अनुमानाचा तपशीलातील महत्त्वाचे मुद्दे
हेही वाचा- मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता