खूशखबर, म्हाडाची दसऱ्याला ९ हजार घरांची सोडत निघणार

घर घेण्याची इच्छा असणाऱ्या मुंबई आणि ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. दसऱ्याला म्हाडाच्या ९ हजार घरांची सोडत निघणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतील ६५००, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर २० टक्के योजनेतील ५०० घरांचा या सोडतीत समावेश आहे. 

म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. २०१८ मध्ये ९०१८ घरांसाठी सोडत निघाली होती. यंदा म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर नऊ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील. मीरारोड, ठाण्यातील वर्तकनगर, विरारमधील बोळींज, कल्याण, वडवली, आणि ठाण्यातील गोठेघर येथे ही घरं असणार आहेत. 

मिरारोड येथे मध्यम उत्पन्न गटासाठी १ बीएचके आणि २ बीएचके  १९६ घरे  आहेत. ठाण्यातील वर्तकनगर येथील अल्प गटातील ६७ घरे सोडतीत असून ही घरे ३२० चौ. फुटांची असून किमत ३८ ते ४० लाखांदरम्यान असेल.

विरार-बोळींजमधील १३०० घरे असून यामधील एक हजार घरे अल्प तर उर्वरित घरे मध्यम गटातील आहेत. कल्याणमध्ये २००० घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून त्याची किंमत १६ लाख रुपये असेल.

ठाणेमधील गोठेघर येथे ३०० चौ. फूटांची १२०० घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून  किंमत १७ लाख आहे. वडवली येथे २० घरे, तर कासारवडवलीत ३५० घरे अल्प गटासाठी असून किंमत १६ लाख आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या