मुंबई - राज्यासह देशभरातील टोल नाके शुक्रवारच्या मध्यरात्रीपासू सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यभरासह देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर पुन्हा टोल भरावा लागणाराय. तर टोल नाक्यांवर सुट्ट्या पैशांची समस्या उद्भवू नये म्हणून 5 ते 100 रुपयांपर्यंत कुपन देण्यात येणार आहेत. त्यामुळे सुट्ट्या पैशावरून वाद होणार नाही.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील 65 टोल नाक्यांवर वसुली बंद होती. गेले तीन आठवडे टोलवसुली बंद होती. नोटाबंदीनंतर राज्य सरकारनं पाच वेळी टोल बंदीचा निर्णय घेतला होता.