Advertisement

आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य

आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य
SHARES

आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं आहे. एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी दिली आहे असेही गडकरींनी स्पष्ट केलं. चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ८ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान ६ एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं याआधीच १ जुलै २०१९ पासून चालक एअरबॅग आणि १ जानेवारी २०२२ पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

चारचाकी गाडींमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना टक्करांचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणी म्हणजेच ८ आसनी वाहनामध्ये ४ अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एअरबॅग्सची संख्या वाढली तर कारमधील अतिरिक्त एअरबॅगमुळे कारची किंमत प्रति एअरबॅग ३,००० ते ४,००० रुपयांनी वाढेल. मात्र रस्ते अपघात झाल्यास आपल्या देशातील गरिबांनाही संरक्षण मिळाले पाहिजे.

एका अहवालानुसार, मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी चार एअर बॅग्स लावल्या तर किंमत फक्त ८ ते ९ हजारांनी वाढेल. एअर बॅग्सची किंमत १८०० रुपये आहे आणि त्याचं मॉडिफिकेशन करण्यासाठी ५०० रुपयांचा खर्च येईल. यात मजुरी आणि महागाई दरही आहे. दुसरीकडे, कंपनी उत्पादकांच्या मते एअरबॅग्स दिल्यास गाड्यांची किंमत ३० हजारांनी वाढेल.



हेही वाचा

आधार कार्डसोबत मतदान कार्ड लिंक होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा