मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गुरूवारी कोरोने ३५५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत गुरूवारी दिवसभरात १३५० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचाः-अरे बापरे ! राज्यात ४२२ जणांचा एका दिवसात कोरोनाने मृत्यू, ११ हजार ११९ नवे रुग्ण
राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३० रुग्ण दगावले आहेत. तर २५ आॅगस्ट रोजी ३५ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ आॅगस्ट रोजी एकूण २८ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे १३५० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ४० हजार ८८२ इतकी झाली आहे. तर गुरूवारी दिवसभरात ८३४ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १३ हजार ५७७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचाः-कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात तब्बल ५७.७६ टक्के वाढ
राज्यात आज ९१३६ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ७१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४६ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७८ हजार २३४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३८ लाख ६२ हजार १८४ नमुन्यांपैकी ७ लाख ३३ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९९ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख २४ हजार २३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३५५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२ टक्के एवढा आहे.
आज निदान झालेले १४,७१८ नविन रुग्ण, नोंद झालेले ३५५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१३५० (३०), ठाणे- २३८ (१२), ठाणे मनपा-१८३ (१), नवी मुंबई मनपा-४०५ (११), कल्याण डोंबिवली मनपा-२७८, उल्हासनगर मनपा-२१, भिवंडी निजामपूर मनपा-१६ (१), मीरा भाईंदर मनपा-१८९ (६), पालघर-१३० (२), वसई-विरार मनपा-१७६, रायगड-३०५ (१३), पनवेल मनपा-२१४ (७), नाशिक-२१९ (१५), नाशिक मनपा-७४० (१६), मालेगाव मनपा-४६ (१), अहमदनगर-३४७ (४),अहमदनगर मनपा-२५८ (४), धुळे-७२, धुळे मनपा-७८ (१), जळगाव- ६०३ (७), ९जळगाव मनपा-९४ (३), नंदूरबार-१४३ (३), पुणे- ८१९ (१२), पुणे मनपा-१७७२ (३५), पिंपरी चिंचवड मनपा-१०८५, सोलापूर-२५१ (१४), सोलापूर मनपा-५६ (४), सातारा-५३२ (२), कोल्हापूर-३५२ (२२), कोल्हापूर मनपा-१५१ (५), सांगली-२४७ (११), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७६ (६), सिंधुदूर्ग-१८, रत्नागिरी-६४, औरंगाबाद-१३५ (१),औरंगाबाद मनपा-११९ (५), जालना-४३ (४), हिंगोली-५९ (१), परभणी-४८, परभणी मनपा-२५, लातूर-८५ (२), लातूर मनपा-१२८ (१), उस्मानाबाद-४९ (४),बीड-५६ (२), नांदेड-१११ (१८), नांदेड मनपा-१८२ (१३), अकोला-४२ (२), अकोला मनपा-१२, अमरावती-४५, अमरावती मनपा-८६ , यवतमाळ-११७ (२), बुलढाणा-६७ (२), वाशिम-२८, नागपूर-१५२ (२), नागपूर मनपा-१०८६ (३४), वर्धा-४१ (३), भंडारा-३९ (४), गोंदिया-६५, चंद्रपूर-७४, चंद्रपूर मनपा-४९, गडचिरोली-२५, इतर राज्य २२ (३).