Advertisement

लाॅकडाऊनचं उल्लघंन केल्याप्रकरणी राज्यात २ लाख गुन्हे दाखल

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,४३० वाहने जप्त करण्यात आली.

लाॅकडाऊनचं उल्लघंन केल्याप्रकरणी राज्यात २ लाख गुन्हे दाखल
SHARES

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७० हजार गुन्हे नोंदवण्यात आले असल्याची माहिती गृहखात्याकडून देण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लघंनकरून विना कारण फिरणाऱ्या १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आले आहेत. आता पर्यंत कारवाई करण्यात आलेल्यांकडून २८ कोटी ४० लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

हेही वाचाः- मनसेचे मुद्दे रोकठोक पण…

महाराष्ट्रात अनलाँकडाऊन ४ ची जरी घोषणा करण्यात आली. तरी कोरोनाचे संक्रमण अद्याप नियंत्रणात आलेले नाही. त्यामुळे राज्यातील लाँकडाऊन हा टप्या टप्याने वाढवण्यात आला. राज्यात २२ मार्च ते २६ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,७०,५७१ गुन्हे नोंद झाले असून ३७,०४२ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर ९६,४३०वाहने जप्त केली. यातील विविध गुन्हांसाठी  २८ कोटी ४० लाख ६०  हजार २६४ रु. दंड आकारण्यात आला.

हेही वाचाः- विमा घेण्यापूर्वी कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो नक्कीच पहा

कोरोनाशी दोन हात करण्यात अत्यावश्य सेवेतील अधिकारी व्यस्त असताना. काही विकृत त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३६४ घटना घडल्या. त्यात ८९५ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस विभागाचा १०० नंबर  हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,१३,२९३ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,४३० वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २१७ पोलीस व २४ अधिकारी अशा एकूण २४१ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा