मकरंद नार्वेकर पत्रात म्हणाले “अंधेरी (Andheri) पूर्व मधील झोन 3 येथे फक्त 5 किमी रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. अंधेरी पश्चिम येथील झोन 4 मध्ये 10 किमी रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित झोन मध्ये चेंबूर (Chembur) मधील झोन 5, घाटकोपर (Ghatkopar) पूर्व मधील झोन 6, कांदिवली (Kandivli) पूर्व मधील झोन 7 येथील फक्त 2 किमी रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. एकूण टप्प्यापैकी 15% रस्ते कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. माझी महानगरपालिकेला अशी विनंती आहे की रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामास विलंंब करणाऱ्यांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात यावी.”
तसेच पुढे मकरंद नार्वेकर म्हणाले की, “रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामात उशीर झाल्यामुळे पावसाळ्यात लोकांना निकृष्ट अशा रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. ते पुढे म्हणाले, “नागरिकांची अपेक्षा आहे की महापालिकेने आपल्या करदात्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे, ज्यामुळे आमच्या राहणीमानाचा दर्जा सुधारेल.”अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “सध्या पावसाळा असल्याने काम रखडले आहे.” “आतापर्यंत, सीसी रोड फेज 1चे काम 30% पूर्ण झाले आहे. पावसाळ्यानंतर पुन्हा काम सुरू करू. उर्वरित काम नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाईल.”
शहरात 2,050 किमीचे रस्त्यांचे जाळे आहे, त्यापैकी अंदाजे 1000 किमीचे काँक्रिटीकरण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर, बीएमसीने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला.गेल्या वर्षी, नागरी संस्थेने 397 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 6080 कोटींच्या निविदा जारी केल्या आणि पाच कंपन्यांना कंत्राट दिले. तथापि, विलंबामुळे, महापालिकेने शहरातील 97 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (RSIIL) सोबतचा 1,600 कोटींचा करार रद्द केला.
हेही वाचा
मुंबईतील खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेकडून 275 कोटींची तरतूद