बोरीवली - पश्चिमेकडील लिंक रोड, शांती आश्रम, देवीदास रोड आणि एक्सर रोड अश्या चार ठिकाणी जाण्यासाठी मिळणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीला नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारे सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. बाजूला असलेल्या सेंट लॉरेन्स शाळेतील विद्याथी आणि नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी आपला जीव धोक्यात घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. अनेक वेळा भरधाव वेगात येणाऱ्या गाड्या रस्ता ओलांडताना या ठिकाणी अपघात होतात. "लवकरात लवकर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सिग्नल लावावे, नाही तर किमान वाहतूक पोलिसांना तरी या ठिकाणी ठेवावे अशी मागणी नागरिक प्रशांत म्हात्रे यांनी केली. "