Advertisement

कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बारा तास बंद

या बंदच्या काळात व्हाॅल्व्ह दुरुस्तीचीकामे केली जाणार आहेत.

कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बारा तास बंद
SHARES

देखभाल, दुरुस्ती आणि व्हाॅल्व्ह बदलण्याची तसेच जलवाहिन्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यासाठी कल्याण (kalyan), डोंबिवली (dombivali) शहरांचा पाणी पुरवठा येत्या गुरूवारी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे बंद (water cut) ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा पाणी पुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan-dombivali municipal corporation)  हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उल्हास नदी काठावरील मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे अत्यावश्यक काम केले जाणार आहे.

तसेच कल्याण- डोंबिवली विभागातील अनेक मुख्य जलवाहिन्यांवरील व्हाॅल्व्ह खराब झाले आहेत. या व्हाॅल्व्हमधून पाणी गळती होते. हे पाणी रस्त्यावर येत असल्याने पादचारी, वाहन चालकांना त्याचा त्रास होतो.

याविषयी पालिकेत या पाणी गळती विषयक अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बंदच्या काळात ही व्हाॅल्व्ह दुरुस्तीची कामेही प्राधान्याने केली जाणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा