बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ३२६ झोपड्या पाडून महात्मा फुले रोड ९० फुटांपर्यंत वाढवला आहे. हा रोड गोराई समुद्रकिनारा आणि प्रसिद्ध पॅगोडा यांना जोडतो. या मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
प्रशासकीय संस्था पुढील आठवड्यात हा नवीन रस्ता वाहतुकीसाठी खुला करेल, असे आर सेंट्रल प्रभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
“रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींना रंगवण्यात येणार आहेत. तसेच लाईटिंगचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. BMC ने या सुविधांसाठी ₹ 1.5 कोटींची तरतूद केली आहे,” अधिका-याने सांगितले.
प्रशासकीय अधिकार्याने सांगितले की हा रस्ता 40 फूट रुंदीचा होता आणि अतिक्रमणामुळे निमुळता झाला होता. याचाच परिणाम की अग्निशमन दलाला आपतकालीन परिस्थिती निमुळत्या रस्त्यामुळे प्रवेश करता येत नाही.
नुकतीच श्री कॉम्प्लेक्स सीएचएस आणि रॉयल पॅलेस सीएचएस येथे लागलेली आग विझविण्यासाठी अडचणी आल्या.
“पाणी साचण्याच्या समस्याही होत होत्या. पण आता बीच आणि पॅगोडाकडे जाणार्या या रस्त्यावरून बसेसही धावू शकतात,” असे अधिकारी म्हणाले.
सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर म्हणाल्या, “आता ६,००० ते ७,००० स्क्वेअर मीटरमध्ये ९० फूट रुंद रस्ता तयार करण्यात आला आहे. आमदार निधीतून भिंतीचे सुशोभीकरण करणार आहोत. 326 झोपड्या हटवल्यानंतर सुमारे 600 मीटर रस्त्याची जागा मोकळी करण्यात आली.
हा गोराई एंट्री पॉइंट आहे त्यामुळे पथदिवे आणि बाकांनी सुशोभित केले जाईल, असे त्या म्हणाल्या.
प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, 326 कुटुंबांपैकी 133 कुटुंबांचे पंडित मल्लाराव कुलकर्णी रोडवरील पालिकेच्या मालकीच्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित झोपड्या बेकायदेशीर आहेत, पण त्यांची सुनावणी सुरू आहे.