Advertisement

आयआयटी मुंबईमध्ये 75 टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या

आयआयटी मुंबईतील 75 टक्के विद्यार्थ्यांना गेल्या शैक्षणिक वर्षात नोकरी मेळाव्यातून (कॅम्पस प्लेसमेंट) राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकरी मिळाली आहे.

आयआयटी मुंबईमध्ये 75 टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या
SHARES

आयआयटी (IIT) मुंबईतील (mumbai) 75 टक्के विद्यार्थ्यांना गेल्या शैक्षणिक वर्षात नोकरी मेळाव्यातून (कॅम्पस प्लेसमेंट) राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकरी मिळाली आहे.

शिक्षण पूर्ण करणाऱ्या किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून निवड करतात. वर्षातून दोनदा होणारे आयआयटीचे कॅम्पस प्लेसमेंट (placement) चर्चेचे ठरतात. 

यंदा प्लेसमेंटमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 75 टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी (jobs) मिळाली आहे. मात्र यंदा विद्यार्थ्यांच्या सरासरी पगारात (पॅकेज) 7.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी 21 लाख 80 हजार सरासरी पगार देण्यात आला होता. यंदा पगाराची सरासरी 23 लाख 50 हजार रुपये आहे.

आयआयटी मुंबईच्या (iit bombay) कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यंदा 2 हजार 414 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 1 हजार 979 विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी मुलाखत दिली. त्यातील 1 हजार 475 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे.

आयआयटी मुंबईच्या मुलाखत मेळाव्यात आतापर्यंत सर्वात कमी पगार सहा लाख रुपये होता. मात्र यंदा किमान पगार चार लाख रुपये करण्यात आले. तरीही 10 विद्यार्थ्यांनी वार्षिक चार ते सहा लाख रुपयांची नोकरी स्वीकारली आहे.

123 कंपन्यांनी 558 जणांना वार्षिक 20 लाखांपेक्षा अधिक पगार देऊ केला आहे. तर 70 कंपन्यांनी 230 जणांना 16.75 ते 20 लाखांपर्यंत वार्षिक वेतन दिले आहे. दरम्यान 22 जणांना एक कोटी पेक्षा जास्त रकमेचे पॅकेज मिळाले आहे.

यंदा सर्वाधिक 232 नोकऱ्या या विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) क्षेत्रात देण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल संगणक अभियांत्रिकी (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) 230 नोकऱ्या, यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) 229 नोकऱ्या, रसायन अभियांत्रिकी (केमिकल इंजिनिअरिंग) 119 आणि स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) 113 या क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

तसेच परदेशात 78 जणांना नोकऱ्या मिळाल्या, तर भारतातील बहुउद्देशीय कंपन्यांमध्ये 775 जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. भारतातील कंपन्यांनी 622 जणांना नोकऱ्या दिल्या आहेत.

यंदा आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात फारशी उत्साहवर्धक नव्हती. मात्र एप्रिलनंतर प्रमाणात नोकऱ्या देण्यात आल्या.



मरीन ड्राइव्हवरुन वांद्रे आता 15 मिनिटांत गाठता येणार

‘रेबिजमुक्त मुंबई’साठी 28 सप्टेंबरपासून लसीकरण

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा