Advertisement

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे १०वी-१२वीचे परीक्षा क्षुल्क माफ

अनाथ झालेल्या मुलांबाबत राज्य शासनाने एख महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे १०वी-१२वीचे परीक्षा क्षुल्क माफ
SHARES

देशभरात २०२० मध्ये कोरोनानं हाहाःकार माजवला होता. लाखो लोक कोरोना बाधित झाले. अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अनेक मुलं कोरोनामुळे अनाथ झाली. या अनाथ झालेल्या मुलांबाबत राज्य शासनाने एख महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोविड-१९ मुळे पालक गमावलेल्या आणि २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे हयात पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.

कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या मुलांबाबत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून (NCPCR) गतवर्षी सर्वोच्च न्यायालयात माहिती सादर करण्यात आली होती. आकडेवारीनुसार, मार्च २०२० नंतर देशात एकूण १७४२ मुले अनाथ झाली आहेत.

NCPCR च्या आकडेवारीनुसार, देशात सुमारे ७४६४ मुलांनी कोरोनाच्या काळात त्यांच्या पालकांपैकी एकाला गमावले आहे. या कालावधीत एकूण १४० मुलांना असंच सोडून देण्यात आलं होतं.



हेही वाचा

केंद्राच्या विरोधानंतर महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी 'या' आहेत नव्या गाईडलाईन्स

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना शासनाची मदत, 'असा' करा ऑनलाईन अर्ज

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा