Advertisement

राज्यातील सर्व विद्यापीठं, कॉलेजेस 'या' तारखेपर्यंत बंद

उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

राज्यातील सर्व विद्यापीठं, कॉलेजेस 'या' तारखेपर्यंत बंद
SHARES

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं राज्यातील कॉलेजबाबत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालये ही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राज्यतील विद्यापीठातील, महाविद्यालयातील परीक्षा या १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचं देखील ते या वेळी म्हणाले. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे. 

राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात काल सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोविड 19 संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.

विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

उदय सामंत म्हणाले, राज्यातील फक्त अकृषी विद्यापीठ नाही तर इतर खासगी विद्यापीठांना सुद्धा हा निर्णय लागू राहणार आहे, सर्व विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय मंगळवारी मान्य केला आहे. परीक्षांमध्ये अडचणी येत असतील तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन नंबर देण्याचा सूचना दिल्या आहेत.



हेही वाचा

स्थानिक पालिका कार्यालयात जाणाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

मुंबई महापालिकेचा 'या' विद्यार्थ्यांसाठी ३९ कोटींचे टॅब खरेदीचा निर्णय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा