लॉकडाऊनमुळं १०वी, १२वीच्या उत्तरपत्रिका शाळांमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तपासणीसाठी पोहोचाव्यात यासाठी मंडळाकडून पोस्टाची मदत घेण्यात आली आहे. यासाठी मुंबई विभागीय मंडळाकडून कार्यवाही सुरू झाली असून त्यासंबंधित विनंती पत्रही मंडळानं पोस्टाला दिल्याची माहिती समोर येत आहे. पेपर तपासणीसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नियामक यांना शिथिलता देण्याचं पत्र उच्च व उच्च माध्यमिक मंडळानं सर्व जिल्ह्यांतील आयुक्त, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या औषधांची ने-आण करणं, ही पोस्टाची प्राथमिकता आहे. मात्र, मंडळाची विनंती मान्य करून पोस्टाकडून उत्तरपत्रिका ने-आण करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, २१ मार्च रोजी झालेल्या १०च्या इतिहास विषयाच्या उत्तरपत्रिका पोस्टानं जिल्ह्यातील संबंधित विभागात पाठविण्यात येणार आहेत.
या उत्तरपत्रिका संबंधित शाळांनी स्वीकारून परीक्षकापर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही विभागीय मंडळानं दिल्या आहेत. उत्तपपत्रिका या पुन्हा पोस्टात परत जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असं आवाहनही मुख्याध्यापकांना करण्यात आल्याचं समजतं आहे.
पासेससाठी या आधीच जिल्हा महानगरपालिका आयुक्त, पोलीस नियंत्रण कक्ष यांना पत्र देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष पासेसची व्यवस्था करण्याची मागणी अत्यावश्यक सेवेसाठीचे पास अद्याप न मिळाल्यानं शिक्षकांनी शाळेतून पेपर घेऊन येण्यास विरोध केला आहे. अजूनही परीक्षकांना नियमकांकडं पेपर जमा करण्यासाठी पासेस मिळालेले नाहीत.
हेही वाचा -
यंदा पावसाळ्यात मुंबईत २९१ ठिकाणी पाणी तुंबणार?
कोरोना चाचण्यांबाबत पालिकेची पुन्हा एकदा नवी नियमावली