'आयआयटी'मध्ये प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डच्या गुणांबरोबरच १२वीत ७५ टक्के किंवा टॉप २० पर्सेंटाइल गुण आवश्यक असतात. यावर्षी ही अट शिथिल करण्यात आली आहे. विद्यार्थी १२वीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. तसेच जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षाही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
याबाबत नुकतीच देशातील मुंबईसह सर्व 'आयआयटी'च्या संचालकांची बैठक झाली. त्यानंतर संयुक्त परीक्षा मंडळाने याबाबतचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनीही ट्वीटद्वारे माहिती प्रसिद्ध केली आहे.
'आयआयटी' प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त १२वीत किमान ७५ टक्के गुण किंवा टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य असते. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १२वीत किमान ६५ टक्के गुण आणि टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य आहे.यंदा कोरोनामुळे सीबीएसई, आयसीएसई बोर्डांनी १०वी, १२वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दोन्ही शिक्षण मंडळांनी निकाल लावताना अन्य परीक्षांच्या गुणांच्या आधारे मूल्यांकनाच्या विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणांवर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे संयुक्त परीक्षा मंडळाने १२वी गुण ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतला.
Kalyan Dombivali Hotspot List : कल्याण-डोंबिवलीत 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन
Containment Zones List Thane : ठाणेमध्ये 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन