चेंबूर - विजयादशमीच्या दिवशी दुर्गा मातेचं विसर्जन झाल्यानंतर चेंबूर अयोध्यानगर,वाशीनाका इथल्या मंदिरात दरवर्षी बकऱ्याचा बळी दिला जातो.ज्या भाविकांची मनोकामना,नवस पूर्ण झाले आहेत ते भाविक मोठ्या भक्तीनं ही प्रथा जपतात. 1950 पासून ही प्रथा येथे जपली जातेय. महाप्रसाद म्हणून बकऱ्याचं मटण सर्व भाविकांना वाटलं जातं. या प्रसादासाठी मोठ्या संख्येनं भाविक गर्दी करतात.