सर्वोच्च न्यायालयानं नुकतीच शिवतीर्थावर शिवसेनेचाच (Shiv Sena) दसरा मेळावा होणार असा निर्णय दिला. एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंविरोधात बंड केला. त्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा. शिंदे गटाने देखील दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी पालिकेला अर्ज करत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पालिकेनं (BMC) शिवसेना आणि शिंदे गट दोघांचे अर्ज फेटाळले. अखेर शिवसेनेने कोर्टात धाव घेतली. कोर्टानं देखील शिवसेनेच्या बाजूनं निकाल दिला.
पण शिवसेनेसाठी शिवाजी पार्क (Shivaji Park) इतका महत्त्वाचा का आहे? हेच आपण काही मुद्द्यांमधून जाणून घेऊयात.
शिवसेना म्हटलं की मुंबईकराच्या (Mumbaikar) डोळ्यांसमोर दोन गोष्टी नक्की येतात... शिवसेना भवन आणि दसऱ्याला शिवसैनिकांनी खचाखच भरलेल्या शिवतीर्थावर - शिवाजी पार्कात भाषणासाठी कमरेवर हात ठेऊन उभे असलेले बाळासाहेब.
शिवसेनेच्या स्थापनेपासून ते पक्षासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या प्रत्येक घटनेला शिवाजी पार्क साक्षीदार आहे. म्हणून ठाकरे कुटुंबातील चारही पिढ्यांसाठी शिवाजी पार्क प्रतिष्ठेचे मानले जाते.
शिवसेनेचा साक्षीदार शिवाजी पार्क
१९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर बाळासाहेबांनी पक्षाची पहिली जाहीर सभा घेण्याचं ठरवलं. यासाठी दसऱ्याची निवड करण्यात आली कारण त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. ठरल्यानुसार ३० ऑक्टोबर १९६६ ला दसरा मेळावा झाला. तेव्हापासून शिवसेनेची ही दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे.
शिवतीर्थावरच घेतले महत्त्वाचे निर्णय
बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अंतिमसंस्कार करण्यात आले, त्याच शिवाजी पार्कच्या एका भागामध्ये आज त्यांचं स्मृतीस्थळ आहे. याच ठिकाणी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
बाळासाहेबांच्या पत्नी - मीनाताई ठाकरे, ज्यांना 'मां' म्हटलं जायचं त्यांचाही पुतळा या शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारापाशी आहे.
शिवाजी पार्कपासून अगदी जवळ असणाऱ्या महापौर बंगल्यामध्ये आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक होणार आहे.
मैदानाला लाभलेला राजकीय इतिहास
शिवसेनेच्या आधीही हे स्थळ राजकीय अर्थाने आधीच चर्चेत असणारं होतं. १९५० च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान मराठी भाषिक राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलनासाठी शिवाजी पार्क हे महत्त्वाचे ठिकाण होते. शिवाजी पार्कवर अनेक मोर्चे काढले गेले ज्यात प्रबोधनकार ठाकरे देखील सामील होते.
हेही वाचा