महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली यावेळी मशिदींवर लावलेले लाऊडस्पीकर हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ तारखेचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तर रविवारी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे.
राज ठाकरेंच्या या रॅलीला स्थानिक पोलिसांनी काही अटींसह मंजुरी दिली होती. मात्र, ही सभा संपल्यानंतर औरंगाबाद पोलिस आता राज ठाकरेंच्या भाषणाची चौकशी करणार असून पोलिसांनी दिलेल्या अटींपैकी कोणतीही अट मोडल्यास पोलिस कारवाई करू शकतात.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत राज्य सरकारला ३ तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला. त्यानंतर आता पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. ३ तारखेपर्यंत मशिदींवरून भोंगे हटवले नाहीत तर ४ तारखेपासून अजिबात कुणाचं ऐकणार नाही आणि मशिदींसमोर दुहेरी आवाजात हनुमान चालीसाचं पठन करण्यात येईल, असं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सभेत बजावलं.
अटी काय होत्या?
मात्र, आता पोलीस राज ठाकरेंच्या भाषणाची चौकशी करून यातील काही अटींचा भंग झाला आहे का, याचा शोध घेणार आहेत.
हेही वाचा