Advertisement

पूरग्रस्तांकडून ‘या’ कारणांमुळे चेक परत घेतले, अनिल परब यांचा खुलासा

मदतनिधीचे चेक प्रशासनाने परत घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून भाजपकडून रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यावर अनिल परब यांनी खुलासा केला आहे.

पूरग्रस्तांकडून ‘या’ कारणांमुळे चेक परत घेतले, अनिल परब यांचा खुलासा
SHARES

रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना शासकीय मदतीचे चेक देण्यात आले होते. परंतु हे मद

याबाबत अधिक माहिती देताना अनिल परब यांनी सांगितलं की, मी स्वत: जाऊन पोसरे गावात पूरग्रस्तांना सरकारी मदतीचे चेक देऊन आलो होतो. पण चेक दिलेली बँक ३० किलोमीटर लांब असल्याने तिथं जाण्यास अडचण येईल. शिवाय पूरग्रस्तांची घरं, बँकांसंदर्भातील कागदपत्रं पाण्यात गेल्याने खातेक्रमांक सापडण्यास अडचणी येत होती. एवढंच नाही तर चिपळूणच्या सर्व बँका पुराच्या पाण्याखाली गेल्याने शासनाच्या प्रतिनिधीने हे चेक परत घेतले आणि स्वत: इतर शाखांत जाऊन सगळ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले, असा खुलासा अनिल परब यांनी केला आहे.

हेही वाचा- कोश्यारी घटनात्मक पदापेक्षा RSS साठीच काम करताना दिसतात- नितीन राऊत

शिवाय रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी याबाबत खुलासा करताना म्हटलं की, चेक वाटपाबाबत बातमी चुकीची होती. खेडमधल्या पोसरेमधील ४ मृतांच्या वारसांना चेकचं वाटप करण्यात आलं होतं. मात्र, दुर्घटनाग्रस्त लोकांची घरं गाडली गेल्यामुळे त्यांच्याकडे बँक खाते क्रमांक देखील नव्हता. तसंच बँकही ३० किमी लांब होती. त्यामुळे लाभार्थ्यांच्या विनंतीनुसार संबंधित तलाठ्यांनी हे चेक परत घेऊन पैसे थेट बँकेत जमा केले. सध्याच्या घडीला सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. 

दरम्यान, हे राज्य सरकारच मुळात देखाव्याचं आहे. भावनिक आवाहन शाब्दीक खेळ व देखावा यातच रममाणअसेलेलं हे सरकार. रत्नागिरीत पोसरेत पालकमंत्री अनिल परब यांनी ग्रामस्थांना दिलेले मदतीचे चेक परत घेतले, मृतांच्याकुटुंबियांकडून चेक परत घेतले, फोटोसेशनसाठी मंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना चेक दिले?, असा प्रश्न भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विचारला आहे.
तर, जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा रे! अनिल परब तुम्हाला फोटोसेशनची एवढी हौस आहे तर तुमच्या घराजवळच एक फोटोग्राफर आहेत. जे घरी बसूनच असतात. त्यांच्याकडे जायचे. ग्रामस्थांना मदतीचे चेक देण्याची नौटंकी करून त्यांच्या वेदनांवर मीठ का चोळता?, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली. 

हेही वाचा- “राज्यपाल असल्याचा त्यांना विसर पडलाय का”, नवाब मलिकांनी भगतसिंह कोश्यारींना सुनावलं

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा