02/9

मधुबालाबरोबरसुद्धा दिलीप साहेबांनी एकुण चार सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. तराना, संगदिल, अमर आणि मुगल-ए-आजम या सिनेमांमध्ये दिलीप कुमार-मधुबाला ही जोडी झळकली होती.
03/9

दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मकथेमध्येच कबुल केलं होतं की, त्यांना मधुबाला आवडू लागल्या होत्या. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं पण मधुबाला यांच्या वडिलांची या नात्याला परवानगी नव्हती.
04/9

मधुबाला यांच्या वडिलांना दिलीप कुमार पसंत नव्हते. 'नया दौर' दरम्यान झालेल्या कोर्ट केसमुळे तर दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे वडील यांच्यामध्ये वादाची ठिणगीच पडली.
05/9

'नया दौर' या शूटिंग दरम्यान ४० दिवस आउटडोअर शूट करायचं होतं. पण मधुबालांचे वडील याकरता तयार नव्हते. त्यामुळे बीआर चोप्रा यांनी वैजयंतीमाला यांना संधी दिली. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं आणि दिलीप कुमार यांनी दिग्दर्शकाच्या बाजुने साक्ष दिली. यामुळे दिलीप कुमार-मधुबाला यांच्या लव्हस्टोरीवर परिणाम झाला होता. त्यानंतर दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना लग्नासाठी विचारलं असता मधुबालांनी दिलीप कुमार यांना त्यांच्या वडिलांची माफी मागण्यास सांगितलं. या गोष्टीस दिलीप कुमार यांनी नकार दिला होता. यावेळी दिलीप कुमार आणि मधुबाला पूर्णपणे वेगळे झाले.
06/9

मीडिया अहवालांच्या मते 'मुगल-ए-आझम' च्या चित्रीकरणावेळी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना ओळख दाखवणंही बंद केलं होतं.
07/9

यानंतर 1966 मध्ये दिलीप कुमार यांचा सायरा बानो यांच्याबरोबर संसार सुरू झाला. मधुबाला यांनी देखील किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं.
08/9

जेव्हा मधुबाला खूप आजारी पडल्या होत्या त्यावेळी दिलीप कुमार यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणि ते मधुबाला यांना भेटायला गेले देखील होते. मधुबाला यांची अवस्था पाहून दिलिप कुमार यांना फार वाईट वाटले.
09/9

बीबीसीच्या मते मधुबाला यांनी दिलीप कुमार यांचे पाणावलेले डोळे पाहून असं म्हटलं होतं की, ' हमारे शहजादे को उनकी शहजादी मिल गई, मै बहुत खुश हूं.'
१९६९ साली वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षीच मधुबाला यांचं निधन झालं होतं.