Advertisement

लक्ष द्या! ठाण्यात 'या' तारखेला पाणीपुरवठा बंद

ठाणे महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे.

लक्ष द्या! ठाण्यात 'या' तारखेला पाणीपुरवठा बंद
SHARES

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) पाणीपुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्व वाहिनीवर, विशेषत: काटई नाका ते मुकंद कंपनीपर्यंतच्या जलवाहिनीवर आपत्कालीन देखभालीचे काम सुरू आहे. त्यामुळे गुरुवार, 28 नोव्हेंबर (गुरुवार) रोजी दुपारी 12:00 वाजल्यापासून ते शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी काटई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

ठाणे महापालिकेच्या अखत्यारीतील कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम ठराविक कालावधीत होईल.

पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर अनेक तास पाण्याचा दाब कमी राहणे अपेक्षित आहे. या कालावधीसाठी पुरेसा पाणीसाठा करून पाणी काटकसरीने वापरावे, असा सल्ला ठाणे महापालिकेने नागरिकांना दिला आहे.



हेही वाचा

मुंबईतील 'या' भागात 28-29 नोव्हेंबरला पाणीपुरवठा बंद

मुंबईत चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा